सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, – शिंदे-फडणवीस सरकारला झटका
प्रतिनिधी/ मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सन 2017 च्या 227 वॉर्ड रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीने 236 वार्ड केले होते. तर शिंदे-फडणवीस सरकारने ते रद्द करून 2017 प्रमाणे 227 वॉर्ड करण्याचा निणैय घेतला होता. या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी झाली असता, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळी या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते आणि त्यांनीच मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल करताना नऊ वॉर्ड वाढवून 227 वरून वॉर्डची संख्या 236 केली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने ही वार्ड रचना रद्द करून 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणे 227 करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा देणारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना घेतलेल्या वॉर्ड रचनेनुसारच म्हणजेच 236 प्रमाणेच घेण्यात येणार आहे.