रेशनच्या दर्जाबाबत प्रश्न : लाभार्थी चिंतेत : अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी तपासणी करावी
प्रतिनिधी /बेळगाव
गोरगरिबांना वाटप करण्यात येणाऱया रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ वितरित केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रेशनच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी लक्ष घालून रेशनच्या तांदळाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात वाटप करण्यात येणाऱया एका दुकानातून हा तांदूळ लाभार्थ्याला मिळाला आहे. त्यामुळे या प्लास्टिकसदृश तांदळामुळे खळबळ माजली आहे. तांदूळ शिजवल्यानंतर त्यामधून चिकट स्वरुपाचा पदार्थ बाहेर निघत असल्याचा दावादेखील संबंधित लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रेशन तांदळाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळापासून लाभार्थ्यांना मोफत आणि अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. तर
दुसरीकडे प्लास्टिकसदृश तांदूळ वितरणाचा प्रकार समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
रेशन तांदळाबाबत लाभार्थ्यांत धास्ती
दारिद्रय़ रेषेखालील जनतेचे धान्याविना हाल होऊ नयेत यासाठी शासनामार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. कोरोना काळापासून अतिरिक्त पाच किलो धान्य दिले जात आहे. त्यामुळे माणसी दहा किलो तांदूळ मिळत आहे. मात्र, एका रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ लाभार्थ्याला दिला गेला आहे. त्यामुळे रेशनच्या तांदळाबाबत धास्ती निर्माण झाली आहे.
संबंधित लाभार्थ्याने तांदूळ शिजविल्यानंतर त्याला प्लास्टिकसदृश तांदूळ असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थ्याने मिळालेला तांदूळ तसाच ठेवला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आहार निरीक्षकांनी रेशनची योग्य तपासणी करूनच पुरवठा करावा, अशी मागणीही जोर धरून आहे.
भीती…!
मागील दोन वर्षापासून अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना माणसी 10 किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे रेशनच्या वितरणात प्लास्टिकसदृश तांदूळ सापडल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे इतर लाभार्थी देखील तांदूळ घेताना चिंता व्यक्त करत आहेत.