हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
लव्ह जिहादमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच मुंबई येथील हिंदू तरुणीच्या शरीराचे 35 तुकडे करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. नराधम आफताब पुनावाला याने हे कृत्य केले आहे. लखनौ येथेही 19 वषीय तरुणीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचाही खून करण्यात आला आहे. यामुळे लव्ह जिहाद वाढला असून लव्ह जिहाद करणाऱया त्या नराधमांना फासावर लटकवावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंदू मुलींची हत्या करणाऱया नराधम आफताब पुनावाला आणि सुफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे. हिंदू मुलींचे आयुष उद्ध्वस्त करण्याचा हा नवा आतंकवाद आहे. तेव्हा केंद्र सरकारने लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
प्रेमाच्या जाळय़ात ओढून त्यांचे धर्म परिवर्तन करणे, त्यांच्याशी विवाह करणे, विवाहाला नकार दिल्यास बलात्कार किंवा ब्लॅकमेल करणे, हत्या करणे असे प्रकार वाढले आहेत. आता हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महिलांनी सांगितले.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती दाभोळकर, मीना बेनके, पद्मना शिंदे, आक्काताई सुतार, मीलन पवार, सुरेखा चिंडक, नीशा बंग, लिना टोपण्णावर, मनीषा कंकणमेली, सुधीर हेरेकर, विजय नंदगडकर, ऋषिकेश गुर्जर, मारुती सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.