प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन काळात बंद असलेली मासेमारी आणि मत्स्य विक्री पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामुळे मच्छिमारांना दिलासा मिळाला आह़े
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशात पाचवी सुधारणा करण्यात आली आह़े सुधारीत पत्रकानुसार लॉकडाऊन काळातही मासे पकडणे, त्यावर प्रक्रिया करणे, विक्री व वाहतूक करणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील एक पत्रक केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे. मासेमारी संदर्भातील सर्व गोष्टींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱया मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच खवय्यांसाठी आता बाजारपेठेत मासे उपलब्ध होणार आहेत.
लॉकडाउनमधील सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, सोशल डिस्टस्टिंग पाळणे, योग्य पध्दतीने स्वच्छतेचे निकष पाळणे इत्यादी अंमलबजावणी कडकपणे करण्यात यावी असे केंद्र शासनाच्या पत्रात नमुद करण्यात आले आह़े तसेच शासन निर्देशानुसार मासे विक्री, वाहतूक होण्यासाठी संबधित जिल्हा प्रशासनाने त्यांचे योग्य प्रकारे नियमन करावे असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आह़े