चंदगड तालुक्मयातील प्रवाशांची गैरसोय : महाराष्ट्र बस कर्नाटकात सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉकच्या शिथिलतेनंतर आंतरराज्य आणि जिल्हांतर्गत बससेवेला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापही महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात दाखल झाली नाही. मागील पाच-सहा महिन्यांपासून महाराष्ट्राची लालपरी सीमाहद्दीपर्यंतच धावत आहे. त्यामुळे सीमाहद्दीसह चंदगड तालुक्मयातील प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
चंदगड तालुक्मयातून दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य उपचार आणि इतर कामांसाठी बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, महाराष्ट्राची बससेवा केवळ सीमाहद्दीपर्यंतच धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना बेळगावला पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या संधीचा फायदा घेत काही खासगी वाहनधारक अधिक पैसे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत. त्यामुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्राच्या बसेसना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशी मागणी सीमाहद्दीतील प्रवाशांतून होत आहे.
कोरोनाआधी चंदगड बस आगारातून बेळगावकडे धावणाऱया बसची संख्या समाधानकारक होती. त्यामुळे चंदगड तालुक्मयातील प्रवाशांची सोय व्हायची. मात्र, मागील काही महिन्यांपासून चंदगड आगारातील बस केवळ शिनोळी फाटय़ापर्यंतच धावत आहेत. तेथून पुढच्या प्रवासासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी वाहनांना अच्छे दिन आले असले तरी प्रवाशांची मात्र यात फरफट होताना दिसत आहे.
गडहिंग्लज आगाराची बससेवाही ठप्प
गडहिंग्लज आगाराची गडहिंग्लज-बेळगाव बससेवादेखील ठप्पच आहे. त्यामुळे गडहिंग्लजसह नेसरी, कोवाड भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय कर्नाटकची बसदेखील गडहिंग्लज आगारात जात नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
चर्चा करून बससेवा सुरू करावी : के. के. लमाणी (केएसआरटीसी विभागीय संचार अधिकारी)
बेळगाव बसस्थानकातून कोल्हापूर व इतर ठिकाणी बस धावत आहेत. मात्र, अद्यापही कोकणात आणि चंदगड तालुक्मयात कर्नाटकची बससेवा ठप्प आहे. महाराष्ट्रातील काही भागात धावणाऱया बसमध्ये प्रवाशांना आरटीपीसीआर बंधकारक आहे. महाराष्ट्राच्या बस कर्नाटकात धावत नाहीत. हा दोन्ही एसटी महामंडळांचा विषय आहे. दोन्ही एसटी महामंडळांनी चर्चा करून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा सुरू करावी.