शेतकऱयांच्या आंदोलनाची दखल, मागील वषीच्या सरासरीनुसारच दर
प्रतिनिधी/ बेळगाव
साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी साखर कारखान्यांना नोटीस बजाविणार असल्याचे सांगण्यात आले होते. कारखाने सुरू होण्यापूर्वी एफआरपी दर जाहीर करावा, अशी मागणी जोर धरली होती. त्यामुळे बेंगळूर येथील साखर आयुक्तांनी जिल्हय़ातील सर्व साखर कारखान्यांनी द्यावयाचा एफआरपीचा दर जाहीर केला आहे.
बेळगाव जिल्हय़ातील 23 साखर कारखान्यांच्या साखरेच्या उताऱयानुसार दर जाहीर करण्यात आला आहे. मागील वषी देखील या साखर कारखान्यांनी केलेले उत्पादन आणि साखरेचा उतारा देखील जाहीर केला आहे. आता बेंगळूरच्या आयुक्तांनी दर जाहीर केल्यानंतर साखर कारखान्यांनी हा देणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे ऊस नेल्यानंतर 14 दिवसांत ऊस बिल द्यावे, अशी मागणीही होत आहे.
साखर आयुक्तांनी दर जाहीर केले असून मागीलवषीच्या सरासरीनुसारच हे दर आहेत. जिल्हय़ातील विविध साखर कारखान्याचे उत्पादन आणि त्यांचा साखरेचा उतारा यानुसार एफआरपी दर जाहीर करण्यात आले आहेत. आता शेतकऱयांना हे दर मान्य होणार की पुन्हा दरासाठी ते आंदोलन करणार हे लवकरच समजणार आहे.