धान्य ही नाही अन पैसे ही परत नाही, रेशन दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात, 20 जूनला पैसे भरले अन तेव्हापासून केसरी कार्ड धारकांचे धान्यच नाही
सातारा / प्रतिनिधी
कोरोनाचा फटका सातारा तालुक्यातील रेशन दुकानदारांना बसला आहे.दुकानदारांनी बिकट अवस्थेत गहाण ठेवून, कर्ज काढून रेशन वाटप करण्यासाठी जून महिन्यात पैसे भरले.पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिने धान्यच आले नाही.त्यामुळे एका बाजूला ग्राहक रेशन मिळाले नाही म्हणून तर इकडे पैसे ही नाही आणि धान्य ही नाही अशा अवस्थेत सातारा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार सापडले आहेत. तब्बल 210 रेशन दुकानदारांचे 10 कोट रुपये शासनाकडे अडकले आहेत. रेशन दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोरोना काळात सरकारने सर्वसामान्य नागरिकांना धान्य देण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले.केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्राधान्य कुटूंब योजनेनुसार मोफत धान्य वाटप करण्यात आले.तर राज्य शासनाने केसरी कार्ड धारकांना 8 रुपये किलो गहू, 12 रुपये किलो तांदूळ प्रति माणसी 3 व 2 किलो प्रमाणे वाटप केले जात होते.जून महिन्यापर्यंत हे वाटप व्यवस्थित होत होते.जुलै महिन्याच्या वाटप करण्यासाठी सातारा तालुक्यातील दुकान दारांनी कर्ज काढून रेशन आणायला पैसे भरले.दि.20जून ला शासनाच्या तिजोरीत पैसे भरले पण जुलै महिन्यात धान्य आले नाही. रेशन आले नाही म्हणून दुकानदाराना ग्राहक सतावू लागले.वादविवाद होऊ लागले.ऑगस्ट गेला, सप्टेंबरचा अर्धा महिना गेला तरीही केशरी कार्ड धारकांचे धान्य ही नाही आणि भरलेले पैसे ही परत नाहीत.सातारा तालुक्यातील 210 रेशन दुकानदारांचे 10 कोट रुपये अडकले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार कोंडीत अडकले आहेत.
आम्हाला सुविधा पण नाहीत
सध्या कोरोना पसरण्याचे प्रमुख केंद्र रेशन दुकान आहे.दुकान दाराना कोणतीही सुविधा दिली नाही.सनिटायझर, मास्क नाही.ग्राहकांचा रेशन घेताना पोझ मशीनवर अंगठा घेतला तर दुसरा ग्राहक रेशन दुकानदारांना ओरडतो.70 दुकानदारांना कोरोना झाला आहे.त्यातील काहीजण बरे झाले आहेत.काहीजण उपचार घेत आहेत.जे मोफत धान्य वाटले त्याचे कमिशन ही दुकानदाराना दिले नाही.आमचे पैसे तरी परत द्या.किंवा रेशनचे धान्य वाटप करण्यासाठी द्या, अशी मागणी आम्ही रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने आम्ही करत आहोत.
श्रीकांत शेटे, अध्यक्ष, सातारा तालुका रेशन दुकानदार संघटना
Related Posts
Add A Comment