आगामी काळात भारत चीनसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता : हरदीप सिंग पुरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत पुढील 15 वर्षांमध्ये एक प्रमुख ग्रीन हायड्रोजन केंद्र बनेल आणि देशांतर्गत मागणी तर पूर्ण करेलच पण एक प्रमुख निर्यातदारही बनणार असल्याचा दावा सीआयआयच्या वार्षिक अधिवेशनात बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे. भारतात पारंपरिक इंधनांना हरित पर्यायांची मागणी वेगाने वाढत आहे, जी विविध स्त्राsतांकडून येत आहे. 2030 पर्यंत देशातील सर्व देशांतर्गत उ•ाणांमध्ये 1 टक्के सतत विमान इंधनाची पूर्तता करण्यासाठी एकूण 14 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता राहणार असल्याचेही ते म्हणाले असून याचा सर्वाधिक लाभ हा कृषी क्षेत्राला होणार असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून सर्व देशांनी हरित ऊर्जा योजनांमध्ये कपात केली आहे, परंतु भारताने तसे केले नाही. तसेच भारतीय उद्योगानेही हरित संक्रमणाच्या योजना वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली असल्याचेही पुरी यांनी स्पष्ट केले आहे. देश पारंपारिक इंधनाच्या विस्तारामध्ये गुंतवणूक करणे थांबवू शकत नाही. ते म्हणाले की आमचे देशांतर्गत अन्वेषण आणि उत्पादन वेगाने वाढेल याची मी खात्री देतो. भारतातील पेट्रोलियमच्या देशांतर्गत मागणीपैकी 85 टक्के मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते. भारताचे देशांतर्गत वायू उत्पादन दरवर्षी 18 टक्क्यांनी वाढत असताना, आयातीत द्रवीभूत नैसर्गिक वायू वर देशाचे अवलंबित्व स्थिर आहे. हरित हायड्रोजन,अमोनिया उत्पादनात चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अशावेळी भारताच्या प्रवेशाने ड्रॅगनची चिंता वाढेल, यात शंका नाही.