ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. काबुल विमानतळ अमेरिकेने ताब्यात घेतल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिकांकडे काबुल विमानतळ हा एकच पर्याय उरला आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून लाखो नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे.
तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. आज सकाळी सुद्धा हजारो नागरिकांची गर्दी विमानतळावर आहे.
दरम्यान, तालिबान बंडखोरांच्या सरकार स्थापनेच्या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. अफगाणिस्थानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि दूतावासांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे नियोजन सर्व देशांकडून सुरू आहे. भारतानं काबूलमधील दुतावास अद्याप बंद केलेला नाही.