प्रतिनिधी /पणजी :
गोव्यात चार वाघ मृत पावल्याने ही देशाच्या संपत्तीची हानी आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. यात दोन-तीन संशयितांना अटक करण्यात आले आहे. म्हादई जंगल परिसरात दोन कुटुंब राहत आहेत. त्यांचे स्थलांतर करण्याचे प्रयोजन चालू असून अतिदुर्गम ठिकाणी राहत असलेल्या लोकांना आम्ही स्थलांतरीत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या वाघांना मारण्यात ज्यांचा हात आहे, त्यांना शिक्षा ही केली जाईल. हैदराबादमधून अजुन रिपोर्ट आला नसल्याने नेमक्या काणत्या प्रकारच्या विषाचा प्रयोग त्यांच्यावर करण्यात आला आहे याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. या घटनेमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारतफ्xढ भरपाई दिली जाईल. सरकार या विषयावर गंभीर असून योग्य दखल आम्ही घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.