मुंबईत अतिवृष्टीचा कोकणातील विद्यार्थ्यांनाही फटका : रद्द केलेला पेपर 29 सप्टेंबरला होणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची 23 सप्टेंबर रोजी होणारी बीएएमएससह एमबीबीएस अभ्यासक्रमाची परीक्षा मुंबईसह राज्यभरातील अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आली आह़े मात्र जिह्यात अतिवृष्टी नसल्यामुळे खेडमधील पटवर्धन लोटे येथे असणाऱया एमएस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना केवळ 2 तास अगोदर शेवटचा पेपर रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल़े यामुळे या विद्यार्थ्यांना राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसला.
बुधवारी अतिवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी जनजीवन कोलमडले. यातच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बीएएमएस अभ्यासक्रमाच्या शेवटचा पेपर बुधवारी नियोजित होत़ा मात्र राज्यभरातील अतिवृष्टीमुळे ही परीक्षा रद्द करुन ती पुढील मंगळवारी 29 रोजी होणार असल्याचे विद्यापीठातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आह़े
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी आह़े मात्र जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे जनजीवन कोलमडले नसल्यामुळे किमान अतिवृष्टी नसलेल्या भागांमध्ये नियोजित परीक्षा होण्यास काहीच अडचण नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितल़े या आधीच कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्य़ा विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. त्यात रद्द झालेला हा पेपर आता 29 सप्टेंबरला होणार असल्यामुळे विद्यार्थीवर्गामधून संप्तप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़
विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून निघणार?
मेडिकल परीक्षेचा गोंधळ गेले 3-4 महिने सुरू होता आणि अखेर 8 सप्टेंबरला परीक्षा सुरू झाल्य़ा एकीकडे सगळे ऑनलाईन परीक्षा देत असताना मेडिकल स्टुडंट मात्र कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा देत होत़े बुधवारी 23 रोजी 11 वाजता शेवटचा पेपर असताना अचानक 9 च्या सुमारास पेपर पोस्टपेन करण्यात आला असून तो सुद्धा 7 दिवस पुढे ढकलण्यात आला आह़े मुंबई व कोकणाला पाऊस नवीन नाह़ी त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसात परीक्षा घेऊ शकत होत़े हे विद्यार्थ्याचे नुकसान कस भरून निघणार?