बेळगाव : शहरातील बहुतांश भाग अंधारात आहे. रस्त्यावरील पथदीप सुरु नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहेत. येथील अनगोळ मेन रोड वरील पथदीप गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळ परिसरात नव्याने पथदीप बसविण्यात आले आहेत.मात्र काही भागात सदर पथदीप असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत .ज्या भागात नागरिकांनी वर्दळ असते त्या भागातील पथदीप बंद असलेले पाहायला मिळत आहे
येथील काही भागात पथदीप दिवसा चालू आणि रात्री बंद असलेले निदर्शनास येत आहेत. मात्र महिनोनमहिने बंद असलेल्या अनगोळ मेन रोडवरील पथदीपकडे दुर्लक्ष करण्यात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे येथील पथदीप लवकरात लवकर सुरु करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.