प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने दिला आहे. मात्र अजूनही शाळा सुरु करावी की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे अलतगा (ता. बेळगाव) येथे ब्रम्हलिंग मंदिरात पालक व शिक्षक वर्गाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चर्चेतून शाळा दोन टप्प्यात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
1 जुलैपासून शाळा सुरु करावी, अशी चर्चा यावेळी करण्यात आली. सकाळी 8 ते 12 यावेळेत पहिली ते चौथी आणि दुपारी 3 ते 5 यावेळेत पाचवी ते सातवी अशा दोन सत्रात शाळा भरविण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष भरमा हिरोजी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सीआरपी विजयलक्ष्मी भगवंतण्णवर यांच्या नेतृत्वाखली ही बैठक पार पडली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य गणपत सुतार, चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडुम, उपाध्यक्ष संजय पाटील, सदस्य महादेव घुग्रेटकर, परशराम पाटील, बाबुराव जाधव, तुकाराम चौगुले, दुगांराम पाटील, हर्षदा पावले, अनिता पाटील, रेणूका पोटे, चंदभागा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता सन्नकी यांनी सरकारचा आदेश वाचला. कोरोनापासून काळजी घेण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी पालक व इतर नागरिक उपस्थित होते.