ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारच्या दबावतंत्रामुळे ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने आपले भारतातील काम बंद केल्याची घोषणा केली आहे.
दिल्ली हिंसाचार आणि जम्मू काश्मीरच्या स्थितीविरुद्ध आवाज उठवल्यानंतर सरकारकडून बँक खाते गोठवण्याची कारवाई करण्यात आली. अंमलबजावणी संचलनालयाने संघटनेचे बँक खाते गोठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संघटनेने भारतातील काम बंद करण्याचा निर्णय घेतला. विरोधी आवाज दाबण्यासाठी सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे.
सरकारकडून सुडाची कारवाई करण्यात येत असल्याचे कारण देत संघटनेने आपले काम थांबवले आहे. मागील वर्षी ‘एमनेस्टी’वर परदेशातून आर्थिक मदत घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विदेशी योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.