बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी तुरहळ्ळीतील सुमारे पाच एकर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही आग लागली. परिसरातील रहिवाशांनी माहिती दिल्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग वीजविण्याचा प्रयत्न केला, ”अशी माहिती मंजुनाथ चंद यांनी दिली.
ते म्हणाले की घडलेली आगीची घटना प्रथमच घडली नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी आगीची घटना घडली होती. दरम्यान वनाधिकाऱ्यांनी याविषयी पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे, वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.” अशी माहिती दिली. दरम्यान अधिकाऱ्यांना याविषयी नेमके भाष्य करता आले नाही.