75400 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या पॅकेजमधून सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना(एमएसएमइ) लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. वित्त मंत्रालयाने सध्या सरकारच्या इमरजन्सी पेडिट लाईन गॅरन्टी योजनेतून 75,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. एक जूनपासून ही योजना सुरु केली आहे. शंभर टक्के गॅरन्टी असणाऱया या योजनेअंतर्गत 32,894.86 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे कोरोना संकटामुळे प्रभावित झालेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम स्वरुपातील उद्योगांना मदत करण्यासाठी ही योजना सरकारने सुरु केली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून 9.25 टक्के दरावर तीन लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज देण्याची घोषणा केली आहे.
कर्ज वितरणात सार्वजनिक क्षेत्रातील 12 आणि खासगी क्षेत्रातील 16 बँकांचा समावेश आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आतापर्यत 42,739.12 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातील 22,197.54 कोटी रुपये वितरित केले आहेत. खासगी क्षेत्रातील बँकांनी 32,687.27 कोटी रुपये मंजूर केले असून यातील 10,697.33 कोटी वितरण केले आहेत.
एसबीआय रिसर्चच्या माहितीनुसार 1 मार्च 2020 पर्यंत एमएसएमइ क्षेत्रावर जवळपास 14 कोटी रुपयांचे कर्ज दिले असल्याचे म्हटले आहे.