दिवसभरात देशात 36 लाख 91 हजार 511 लोकांना लसीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह काही राज्यांकडून लसीचा तुटवडा सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची सविस्तर आकडेवारीच त्यांनी मांडली आहे. त्यासोबतच, गेल्या दोन महिन्यांत देशात मोठय़ा प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढले असून लोकांचे बेजबाबदार वर्तन त्याला कारणीभूत असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
आरोग्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमध्ये आतापर्यंत झालेले लसीकरण, कोणत्या राज्याला किती डोस मिळाले, किती आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण पूर्ण झाले याविषयी माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात भारतात एकाच दिवशी तब्बल 43 लाख लोकांना लस देण्यात आली. जगभरात एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असेल, असे ते म्हणाले. तसेच गुरुवारी दिवसभरात देशात 36 लाख 91 हजार 511 लोकांना लसीकरण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
लसींचा तुटवडा जाणवू लागल्याची तक्रार काही राज्यांकडून केली जात आहे. त्यासोबतच देशात लसींचा पुरवठा अपुरा असताना केंद्र सरकार परदेशात लसीचे डोस निर्यात करत असल्याची टीका देखील करण्यात आली. त्यावर आतापर्यंत परदेशात किती डोस निर्यात झाले, याचीही आकडेवारी आरोग्यमंत्र्यांनी सादर केली. आतापर्यंत भारताकडून 84 देशांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे एकूण 6 कोटी 45 लाख डोस निर्यात करण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत 24 वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. ज्यामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारीही सादर केली. देशात आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्मयांवर पोहोचलेले असतानाच आता ही आकडेवारी 91.22 टक्क्मयांवर पोहोचली आहे. 149 जिह्यांमध्ये मागील 7 दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. तर, 8 जिह्यांमध्ये मागील 14 दिवसांपासून एकाही रुग्णाची नोंद नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती हर्षवर्धन यांनी दिली.