उद्यागेपती सुनील मित्तल यांचे मत :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय उद्योग दूरसंचार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आणि त्याची गती कायम ठेवण्यास अनुकूल आहे, असे भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल यांनी मत मांडले आहे. निवेदिता मुखर्जी आणि शुभयन चक्रवर्ती यांच्याशी झालेल्या संभाषणावेळी मित्तल यांनी अर्थव्यवस्था, 5जी सेवा यासह इतर विषयांवर चर्चा केली.
गुंतवणुकीत तेजी?
देशातले उद्योगपती अधिक गुंतवणूक करण्यास तयार आहेत. भारतात परदेशी कंपन्याही येत आहेत. दूरसंचार उद्योगातही गुंतवणूक होत आहे. आम्ही दरवर्षी 25 हजार ते 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. ही 5जी वर गुंतवणूक असेल असेही ते म्हणाले आहेत.
चीनी विक्रेते पुरवठा साखळीचा एक मोठा भाग आहेत. हे स्पष्ट आहे की विश्वसनीय स्त्राsत, विश्वासार्ह उत्पादने आता महत्त्वाची ठरत आहेत. याबाबतीत चीनी विक्रेत्यांचा वाटा खूपच कमी आहे. आम्ही 5जी नेटवर्कमध्ये चीनी विक्रेत्यांकडून उपकरणे घेतलेली नाहीत, असे मित्तल यांनी सांगत रिलायन्सचीही ही भूमिका असल्याचे ते म्हणाले. व्होडाफोनने अद्याप याबाबतीत स्पष्टीकरण दिलेले नाही.