प्रतिनिधी / उस्मानाबाद
कळंब नगर परिषदेच्या नगरसेवकांची महत्वाची बैठक उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदरील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद मिटवून एक दिलाने काम करण्याचे ठरले. यावेळी तीन नगरसेवकांचे पक्षातील निलंबन रद्द करन्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री लक्ष्मण कापसे यांना गटनेतेपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने शासनाच्या मार्फत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून कळंब शहरातील विकास कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी राज्यमंत्री मा. संजय बनसोडे व जिल्हाअध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या उपस्थितीमध्ये कळंब च्या नगरसेवकांची बैठक मुंबई येथे बोलावण्यात आली होती.
सदरील बैठकीमध्ये कळंबच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना याबाबत निर्देश देण्यात आले होते. जिल्हा कार्यालयात यावेळी सरचिटणीस नितीन बागल, कळम नगराध्यक्ष सुवर्णाताई मुंडे,कळंब तालुका अध्यक्ष श्रीधर भवर, कळंब शहराध्यक्ष मुत्सदिक काझी, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व नगरसेवक उपस्थित होते.