ऑनलाइन टीम / मुंबई :
गेले काही दिवसापासून सत्ताकारणावरून चर्चेत असलेल्या ऍक्सिस बँकेला अजून एक धक्का बसला आहे. बँकेच्या तब्बल 15 हजार कर्मचाऱयांनी नोकरी सोडली आहे. यामध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱयांचा देखील समावेश आहे. नवीन व्यवस्थापन, कार्यपद्धती आणि कामाचा व्याप वाढल्याने या कर्मचाऱयांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या बँकेने कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळे नव्या पद्धतीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेले अधिकारी आणि कर्मचाऱयांनी राजीनामा देणे पसंत केले. सध्याचे वर्क कल्चर जुन्या जाणत्या कर्मचाऱयांसाठी अवघड बनले आहे.
नव्या व्यवस्थापनावर नाराज असल्याचे कारण या कर्मचाऱयांनी दिले आहे. ग्राहकांशी थेट संपर्कामध्ये असणाऱया कर्मचाऱयांचा यात समावेश आहे. याचा फटका बँकेच्या कामकाजावर बसण्याची शक्यता आहे. मात्र, बँकही मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी भरती करत असल्याचा दावा करत आहे.