शिवशाही जळीत कांड घडु नये म्हणून एसटी कर्मचारी सर्तक
प्रतिनिधी/ सातारा
गत वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सातारा एसटी स्टॅड मधील पाच शिवशाही जळून खाक झाल्या. एका दारूडय़ाच्या चुकीच्या कृत्यामुळे ही घटना घडली. या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीसांनी एसटी स्टॅड मध्ये वॉच वाढवला आहे.
सातारा एसटी स्टॅड वर दररोज हजारोच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. या प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी म्हणून शिवशाही बस सुरू करण्यात आली. मात्र याला लॉकडाऊनचा फटका बसल्याने स्टॅड मध्ये परिवहन मंडळाच्या मालकीच्या शिवशाही उभ्या होत्या. तसेच काही खाजगी कंपनीच्या शिवशाही ही उभ्या होत्या. या शिवशाहीत गत वर्षी एका मद्यपी व्यक्तीच्या चुकीने आग लागली होती. या घटनेत एकावेळी पाच शिवशाही जळून खाक झाल्या होत्या. या घटनेची चालु वर्षी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस सर्तक झाले आहे. एसटी स्टॅड मध्ये पोलीसांचा वॉच वाढला आहे. तसेच एसटीचे कर्मचारीही दररोज एसटी बसची पाहणी करत आहेत. एसटी स्टॅड मध्ये कोणीही मद्यपी, विनाकारण फिरणारे तरूण दिसल्यास त्यांना बाहेर जाण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.