नवी दिल्ली
: विमा क्षेत्रातही आपले योगदान देणाऱया एसबीआय लाईफ इन्शुरन्सचा मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील कंपनीचा निव्वळ नफा 16 टक्क्मयांनी वाढून 530.67 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खासगी क्षेत्रातील विमा कंपनीने म्हटले आहे, की एक वर्षाच्या अगोदरच्या तिमाहीमध्ये निक्वळ नफा 457.68 कोटी राहिला होता.
एसबीआय लाईफच्या नियामकच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2019-20 मधील मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीमधील निव्वळ प्रीमियमचे उत्पन्न एक वर्षापूर्वी 11,333.02 कोटी रुपयांनी वधारुन 11,862.98 कोटींवर राहिले आहे. याच दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न घटून 5,674.91 कोटीवर पोहोचले आहे. जे एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 15,600.97 कोटी रुपये होते.
गुंतवणूकीत आलेल्या मोठय़ा घसरणीमुळे कंपनीचे उत्पन्न कमी झाले आहे. विमा कंपनीला जानेवारी ते मार्च 2020 या चौथ्या तिमाहीत गुंतवणुकीत 6,677.19 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जे की सन 2019-20 मध्ये एसबीआय लाईफचा निक्वळ नफा एक वर्षाच्या तुलनेत सात टक्क्मयांनी वाढून 1,420 कोटी झाला आहे.