राज्यसभेत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेनमध्ये युद्धामुळे भारतासमोर मोठे कठीण आव्हान उभे असतानाही भारताने आपल्या 22 हजरांहून अधिक नागरीकांची सुटका करण्यात यश मिळविले आहे. या सर्वांना भारतात गंगा अभियानाच्या अंतर्गत आणण्यात आले आहे. हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चालविण्यात आले, असे भावोत्कट उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत काढले.
युक्रेन परिस्थिती आणि तेथील भारतीय या मुद्दय़ावर त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. युपेनमधल्या स्थितीसंबंधी सरकारने तेथील भारतीय विद्यार्थ्यांना बरेच आधीच सावध केले होते. त्यांना देश सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. तथापि, अनेक विद्यार्थ्यांनी तेथेच राहणे उचित मानले. सरकार त्यांच्यावर देश सोडण्यासाठी दबाव आणू शकत नव्हते. मात्र, युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारताने त्वरित प्रयत्न करुन भारतीयांना त्या देशाबाहेर येण्यास साहाय्य केले. नंतर शेजारच्या देशांमधून त्यांना विमानाने भारतात आणण्यात आले. गंगा अभियानाअंतर्गत ही सुटका करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन संबंधित देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असे प्रतिपादन त्यांनी केले. कर्नाटकातील नवीन ग्यानगौडर या विद्यार्थ्याच्या मृत्यूसंदर्भात त्यांनी दुःख व्यक्त केले. ही घटना टळली असती तर बरे झाले असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विदेशी विद्यार्थ्यांचीही सुटका
भारताने केवळ स्वतःच्याच नव्हे, तर विदेशी विद्यार्थ्यांचीही सुटका केली आहे. यात शेजारी देशांच्या नागरीकांचाही समावेश आहे. 18 देशांच्या 147 विद्यार्थ्यांची भारताने सुटका केली आहे. वसुधैव कुटुंबकम् ही आपली संस्कृती आम्ही आचरणात आणली. भारतीय विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने साऱया युक्रेनभर पसरलेले आहेत. ते एक दोन जागी स्थिरावलेले नाहीत. त्यामुळे त्या सर्वांची सुटका करणे हे कठीण आव्हान होते, ते स्वीकारले गेले, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
मान यांचा राजीनामा स्वीकारला
लोकसभेचे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंतसिंग मान यांचा राजीनामा लोकसमा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे. मान यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली असून ते आज बुधवारी शपथ ग्रहण करणार आहेत.