जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील शेतामध्ये उगवलेल्या पिकांवर ताव मारणाऱया भटक्मया जनावरांची डोकेदुखी वाढली आहे. भटक्मया जनावरांचे कळप दाखल होऊन ज्वारी, मका आणि हरभरा अशी पिके फस्त करीत असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवार दि. 6 रोजी सकाळी 10.30 वा. गावाच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कणबर्गी परिसरातील शेतकऱयांना कधी बुडाचा तर कधी डुकरांचा त्रास सहन करावा लागत आहे. आता भटक्मया जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन -चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, याबाबत जनावरांच्या मालकांना सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. दरवषी भात कापणी झाल्यानंतर डोंगराच्या माथ्याशी असलेल्या भागातील शेतीमध्ये कडपाल पेरण्यात येते. मात्र विविध परिसरातील जनावरे येवून उगवलेले पीक फस्त करीत आहेत. यापूर्वी गावातील शेतकऱयांनी जनावरांना पकडून ठेवले होते. मात्र जनावरांच्या मालकांनी उलट जनावरे चोरल्याचा आरोप करून शेतकऱयांना अडचणीत आणले होते. जनावरे सोडल्याबद्दल जाब विचारल्याने शेतकऱयांना मारबडव करण्यात आली होती. सदर जनावरे शेतामधील सर्व पिके खात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱयांना दिवसभर शेतामध्ये रहावे लागत आहे. पण थोडय़ाशा पिकासाठी दिवसभर शेतात बसावे लागत असल्याने आर्थिक नुकसान देखील होत आहे. पेरणीसाठी खर्च केलेली रक्कम देखील वाया जात आहे. त्यामुळे भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. पण याची दखल घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कणबर्गी परिसरातील शेतकऱयांनी रविवारी बैठक घेऊन चर्चा केली. जनावर मालकांना यापूर्वी अनेकवेळा सांगण्यात आले होते. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या बंदोबस्तासाठी बुधवार दि. 6 रोजी सकाळी 10.30 वा. गावच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.