मुंबई :
देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला नुकतीच सुरुवात झाली असून हा कालावधी 31 मेपर्यंत निश्चित केला आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना येत्या काळात दिलासा मिळण्याची शक्मयता आहे. या अगोदर कर्जाचे हप्ते जमा करण्यासाठीच्या कालावधीत तीन महिन्यांची सवलत दिली होती. परंतु हाच कालावधी आणखीन तीन महिन्यांनी वाढविण्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकच्या एका संशोधन अहवालामधून मांडण्यात आला आहे. आरबीआयने मार्चमध्ये 1 मार्च ते 31 मे 2020 पर्यंत कर्जाची तपरतफेड करण्यास सवलत दिली होती.