वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात 250 हून अधिक पोल्ट्री व्यावसायिक आहेत. पोल्ट्री हा आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय असून परप्रांतातील अनेक कंपन्या हा व्यवसाय करणाऱयांना पिले तसेच खाद्य पुरवठय़ाचे काम करतात. अनेक वेळा कुक्कुटपालन व्यवसाय वेळेवर पिले न देणे, खाद्यपुरवठा न करणे, अटी लादून नुकसानीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना संघटनेमार्फत वचक आणण्यासाठी तसेच नव्याने व्यवसाय सुरू करणाऱयांना संघटित करून व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती खानापूर तालुका पोल्ट्री फार्मर असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष जी. गंगाधर तसेच नूतन पदाधिकाऱयांनी शनिवारी दिली.
यावेळी तालुका नूतन पदाधिकाऱयांची निवडही करण्यात आली. अध्यक्षपदी निवृत्त कार्यकारी अभियंता जी. ई. गंगाधर, उपाध्यक्षपदी लक्ष्मण कसर्लेकर, सचिव सय्यद कित्तूर, सहसचिव राजीव शिरोळकर, कोषागार गोपाळ गुरव यांची निवड केली आहे.
तालुक्मयात पोल्ट्री व्यवसायाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे तालुक्मयात साधारण 270 व्यावसायिक प्रत्येक बॅचला जवळपास 17 लाख पिलांची जोपासना करतात. क्वॉलिटी, इंडियन बर्ड, हिंदुस्थानी, आयडी, वेंकी अशा अनेक कंपन्या पिले देण्याबरोबर खाद्य पुरवठाही करतात. तालुक्मयातील पोल्ट्री व्यावसायिकांनी खानापूर- चंद्रकांत चव्हाण, जांबोटी- निळकंठ देसाई, बेकवाड- सुरेश पाटील, जोतिबा केसरकर, हलशी- मयूर पाटील, चापगाव- इम्तीयाज सनदी व पारिश्वाड- विजय वाली, अर्जुन पायण्णावर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.