ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्ली स्थित कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर शेतकरी नेते राकेत टीकेत यांनी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलन मागे घेण्याची मागणी केली असुन २६ नोव्हेंबरपर्यंत ते मागे न घेतल्यास शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सोमवार दि. 1 नोव्हेंबर रोजी दिला आहे. गेले 11 महिने सुरु असलेले शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला ऩाही. याबाबत शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी वारंवार इशारा दिला असुन केंद्र सरकार यावर कोणतीच ठोस निर्णय घेत नसल्याने टीकैत यांनी पुन्हा केंद्र सरकारचे या कायद्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावेळी टीकैत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, “केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी कृषि कायद्यांसदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरने दिल्लीच्या सीमेवर तसेच आसपासच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि भक्कम तटबंदी करतील.” यामुऴे टीकैत यांच्या या भुमिकेवर केंद्र शासन काय भुमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
31 आक्टोबर रोजी टीकैत यांनी शेतकऱ्यांच्या तंबुमुळे हटवल्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल केलं भाष्य
शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. राकेश टीकैत यांनी म्हटले आहे की “प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे.जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील.”, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनातील वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. टिकैत म्हणाले की, जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले गेले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू. यामुळे शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत तर केंद्र शासन ही याच्यावर काही ठोस भुमिका घेकलेली नाही.