जिल्हा कृषी सहसंचालक शिवनगौडा पाटील यांचे आवाहन
वार्ताहर / काकती
आधुनिक तंत्रज्ञानातून भरघोस उत्पादन आणि आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतकरी गटाद्वारे कृषी योजना व सवलतीचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) योजनेंतर्गत कडोली देवगिरी गावांना जिल्हा कृषी खात्याच्यावतीने भेट देण्यात आली. यावेळी कडोलीचे प्रगतशील शेतकरी गुरुनाथ यल्लाप्पा धायगोंडे यांनी ‘ऍझोला’ उत्पादनासाठी 10 फूट लांब, अडीच फूट रुंद व दीड फूट अशा आकाराची टाकी बांधून ऍझोलाची निर्मिती केली आहे. याकरिता ‘आत्मा’ योजनेतून रुपये 8500 रुपयाचे अनुदान मिळाले आहे. ऍझोला या पान वनस्पतीचे महत्व सांगताना गुरुनाथ धायगोंडे म्हणाले हे हिरवळीचे खत असून दर चौरस मीटरला 300 ग्रॅम ऍझोला भातपिकांच्या शिवारात टाकला.
याची केवळ पंधरा दिवसात वाढ झाली. सर्व शिवारात पान वनस्पतीने भरून गेल्याने पिकातील तणाची सुद्धा वाढ झाली नाही. सुर्यप्रकाश तणापर्यंत पोहचला नाही. हवेतील नत्र स्थिर करून भातपिकास मिळाले. तसेच माझ्या दोन म्हशी व एक गाय यांना खाद्यातून मिसळून घातल्याने दुधाच्या फॅटमध्ये दीड टक्क्मयांनी अर्धा लीटर दुधात वाढ झाली.
आत्माचे प्रमुख योजनाधिकारी डॉ. एच. डी. कोळेकर यांनी ऍझोला पानवनस्पतीचे प्रत्यक्ष टाकीत हात घालून निरीक्षण केले. व ऍझोला पान वनस्पतीच्या संगोपनाचे महत्व विषद केले. यानंतर देवगिरी येथील नागनगौडा पाटील यांच्या ऊस शेतीला भेट दिली. आत्मा योजनेंतर्गत ऊसाची चिपाड रवंदा बारीक करून सेंद्रीय खत करण्यासाठी शुगर पेन ट्रश मल्चर या ट्रक्टरला जोडून बारीक करणाऱया यंत्रणेची माहिती घेतली. आपल्या 16 एकर ऊस शेतीसह इतर 100 एकरातील शेतकऱयांचे या मशिनद्वारे सेंद्रीय खत केल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख अधिकाऱयांसह सहाय्यक कृषी अधिकारी आर. बी. नायकर, सी. आय. हुगार, काकती रयत केंद्राचे प्रमुख अरुण कापशी, कृषी अधिकारी मनोहर गौडा, सहाय्यक के. एस. कब्बूर व शेतकरीवर्ग उपस्थित होता.