प्रतिनिधी/ सातारा
कोरोना चा फटका हळूहळू विविध व्यवसायांना होत आहे. याचा सगळ्यात अधिक फटका हा पर्यटन व्यवसायाला आणि पर्यायाने विमान आणि टूर कंपन्यांना बसला आहे हवाई वाहतुकीचे देखील अधिक नुकसान झाले आहे. कारण सध्या देशांतर्गत व परदेशी हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे व ती पुन्हा कधी सुरू करण्यात येईल याची शाश्वती देखील देण्यात आले नाही. त्यामुळे मोठय़ा आर्थिक नुकसान आला या कंपन्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिक अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याकरिता खबरदारी म्हणून सरकारतर्फे पर्यटन प्रवासावर बंदी आणली, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल. याच बरोबर देशांतर्गत विमान प्रवास देखील सध्या बंद करण्यात आला आहे. विविध राज्यांच्या मागणीनुसार हा प्रवास बंद करण्यात आला आहे. देशातील अधिकाधिक करोना ग्रस्त रुग्ण हे पर्यटन प्रवास केलेले किंवा परदेशी प्रवास करून आलेल्यांच्या संपर्कात आलेले आहेत.
सातारा जिह्यात देखील आतापर्यंत 14 करूना बाधित रुग्ण आढळले असून यातील दोघांनी परदेशी वारी केली होती. या मधील खंडाळा येथील महिलेने दुबई व खेड येथील व्यक्तीने कॅलिफोर्नियाचा प्रवास केला होता. त्याचबरोबर इतर रुग्णही पुणे मुंबई बेंगलोर नागपूर या भागातून आले होते तसेच काही त्यांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह झाले आहेत. एकंदरीत सातारा जिह्यातील स्थानिक कोणीही कोरोना बाधित नसुन बाहेरून आलेलेच कोरोनाग्रस्त आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आल्यामुळे काहीं ना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.