ऑनलाईन टीम
कोरोना विरोधात लढ्यासाठी आता निर्णायक वेळ आली असून आज रात्री 12 वाजल्यापासून देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण हाच उपाय असून देशातील हा लॉकडाऊन 21 दिवसाचा असणार असल्याचेही मोदींनी सांगितले.
आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. येत्या 21 दिवसांत कोरोना आटोक्यात आला नाही तर देशात अनर्थ होईल. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. त्यामुळे आता 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन असणार आहे.