सुहास हडकर यांनी देवेंद्र फडणवीस, नितेश राणेंचे वेधले लक्ष
प्रतिनिधी / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिने रेशन दुकानांवरील ग्राहकांना ई पॉस मशीनला थंब न लावण्याची सवलत शासनाने दिली होती, तीच सवलत कोरोना काळ संपेपर्यंत कायम राहवी, अशी मागणी मालवण वायरी येथील रास्त भाव धान्य दुकानाचे चालक तथा माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.
ऑगस्टपासून शासनाने पुन्हा ग्राहकांचा थंब घेऊन धान्य वितरित करण्याचा घेतलेला निर्णय धोक्मयाचा आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत रेशनिंग ग्राहकांचा ई पॉस मशीनशी थेट संबंध येऊन संसर्गाचा धोका वाढण्याची भीती आहे. ग्राहकांचा थंब न घेता, मार्च ते जून या कालावधीत जसे धान्य दुकानदारांचे थंब लावून धान्य वितरित करण्याची सवलत मिळाली तशीच ती आगामी काही महिने मिळावी, अशी धान्य दुकानदारांची मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत धान्य दुकानदार ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून व सॅनिटायझरचा वापर करून आवश्यक ती सुरक्षितता बाळगून धान्य वितरण करत आहेत. प्रसंगी 24 तास सेवा बजावत आहेत. ग्राहकांची तक्रार येऊ दिली जात नाही. चांगली व तत्पर सेवा रेशन धान्य दुकानदार देतात. एप्रिल ते जून या काळात शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने ई-पॉस मशीनचा वापर थेट ग्राहकांनी न करता, धान्य दुकानदाराने थंबचा वापर करून धान्य वितरित करण्याचा चांगला निर्णय घेतला होता. मात्र, ऑगस्टपासून दुकानदाराने थंब लावण्याची सवलत शासनाने रद्द केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. जिल्हय़ातही रुग्ण वाढत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार एका धान्य दुकानामध्ये जवळपास एक हजार ग्राहक दर महिना एकाच मशीनला आपला अंगठा लावून जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. याबाबत महाराष्ट्र धान्य व केरोसीन संघटनेच्या जिल्हा शाखेने अन्न व नागरी पुरवठामंत्री तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांना निवेदने देऊन लक्ष वेधले. मात्र, त्याची दखल घेतली गेलेली नाही.