डॉक्टरांना देण्यात आलेल्या सुविधा मागे घेतल्या, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मध्यस्थी
प्रतिनिधी/ मडगाव
आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱया निवासी डॉक्टरांना राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या सुविधा मागे घेण्यात आल्याचे कळविण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या प्रकरणी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मध्यस्थी केली असून निवासी डॉक्टरांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
कोरोना रुग्णांची सेवा करणाऱया डॉक्टरांना त्यांना विविध हॉटेलात उपलब्ध करून देण्यात आलेल्या खोल्या आज रविवारी खाली कराव्यात, अशा आशयाची नोटीस बजावल्याने, डॉक्टरवर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) ने राज्य सरकारला पूर्वी प्रमाणेच निवासस्थाने चालू न ठेवल्यास कोविड-19 रुग्णालयांमधून त्यांची सेवा मागे घेण्याचा इशारा दिला आहे.
गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) च्या नुसार राज्य प्रशासनाने मडगाव शहरातील ईएसआय आणि दक्षिण जिल्हा रुग्णालयात कोविड-19 मधील डय़ुटीवर असलेल्या सर्व डॉक्टरांना नोटीस बजावली असून आज रविवारपासून खोल्या रिकाम्या करण्यास सांगितले आहे.
गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टरने, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना निवेदन सादर केले असून त्यात म्हटले आहे की, त्यांना कोणत्याही प्रकारची राहण्याची सोय केली जाणार नाही, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे व त्यांना एक तास अंतरावर असलेल्या गोवा मेडिकल कॉलेजमधून कोविड-19 रुग्णालयात जावे लागणार आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, ‘प्रवासासाठी जवळजवळ एक तास लागतो व बहुतेक डॉक्टर पीपीई किटचा वापर करतात. 8-12 तासांच्या शिफ्टसाठी काम करतात ज्यामुळे त्या सर्वांचाच निचरा होतो.’ ‘याव्यतिरिक्त, ज्ये÷ निवासी डॉक्टर आहेत. जे गंभीर भागात पोस्ट केलेले आहेत जे 24ƒ7 वाजता सेवा देतात. त्यांना एका तासाच्या प्रवासासह त्वरित रुग्णांच्या सेवेसाठी येणे अशक्मय होईल,’ त्यात डॉक्टरांच्या वाहतुकीदरम्यान ‘सुरक्षे’चा प्रश्न ही उपस्थिती होणार आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, मागील पाच महिन्यांतील बहुतेक आमचे कनि÷ रहिवासी नियमित पगारावर असूनही परिश्रमपूर्वक काम करीत आले आहेत. ‘आम्ही सर्वजण अशा निर्णयामुळे निराश आहोत व जीएमसीकडे परत जाण्यासाठी आणि ईएसआय व दक्षिण जिल्हा रुग्णालयातून आमच्या सेवा मागे घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही,’ असोसिएशनने म्हटले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. तसेच मुख्य सचिव व आरोग्य सचिवांना ईमेलही पाठविला आहे. ‘कोरोना’शी लढताना डॉक्टरांच्या भावना विचारात घेण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या सोबत समाज आणि आरोग्यसेवकांनी उभे राहण्याची गरज आहे, असे श्री. राणे यांनी म्हटले आहे.
‘सर्व राज्यात सरकार आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांच्या बाजूने उभी आहे. आम्ही त्यांचा जीव धोक्मयात घालवू शकत नाही’ असेही त्यांनी म्हटले आहे.
डॉक्टरांनी रुग्णांची सेवा मागे घेतली तर सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची परिस्थिती अत्यंत वाईट होण्याची शक्यता आहे. काही रुग्णांची प्रकृती तर बरीच नाजूक आहे. आतापर्यंत जेवढे रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यांच्यासाठी डॉक्टरच खऱया अर्थाने देवदूत बनले होते.