कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यातच : दुकानांची वेळ जैसे थेच
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू पेलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधामध्ये कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आहे. या आठवड्यातही या निर्बंर्धामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे दुकाने खुली राहण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तसेच निर्बंधामध्ये कोणतीही शिथिलता नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी स्पष्ट केले.
दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसर्या टप्प्यात आला. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. गेल्या आठवड्यात यामध्ये 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. उद्या, सोमवारपासून सर्व दुकाने खुली ठेवण्यास वेळ वाढवून देणार असल्याची चर्चा होती.
याबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जिह्यातील निर्बंध हे तिसर्या टप्प्याप्रमाणेच राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच दुकाने खुली ठेवण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल केलेला नाही.