नवी दिल्ली :
कोल इंडियाने वीज क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांना ई लिलाव योजनेअंतर्गत करण्यात येणाऱया पुरवठय़ात चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत तीन पटीने वाढ (66.6 लाख टन) झाली आहे. कोल इंडियाने विक्री वाढविण्यासाठी बिगर वीज क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे.
सरकारी उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार कोल इंडियाने मागील वित्त वर्षात 2019-20 मध्ये एप्रिल ते जून तिमाहीत याच क्षेत्रांमध्ये कोळशाचे वाटप 22 लाख टन केले होते. महारत्न कंपनीकडून योजनेच्या अंतर्गत कोळशाचे वितरण मागील महिन्यात घटून 5.6 लाख टनावर राहिले आहे. जे 2019-20 च्या जूनमध्ये 10 लाख टनावर राहिले होते. संपूर्ण वित्त वर्ष 2019-20 मध्ये उपलब्ध योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा कोळसा पुरवठा घटून 80.3 लाख टनावर आला आहे. जो एक वर्षाच्या अगोदरच्या कालावधीत 1.136 कोटी टनाच्या घरात होता.