मुंबई/प्रतिनिधी
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह १४ आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याआधी ११ लोकांना अटक केल्याची माहिती होती. आता एनसीबीने क्रूजवरील ड्रग्ज पार्टीत १४ लोक होते त्यापैकी ८ जणांना ताब्यात घेऊन ६ जणांना सोडल्याचा म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील वाद आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. एनसीबीनं २ ऑक्टोबर रोजी छापा टाकून आर्यन खानसह इतर आरोपींना अटक करणं हा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर एनसीबीनं देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिय यांनी थेट एनसीबीला आव्हानच दिलं आहे. एनसीबीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकूण १४ लोकांना ताब्यात घेतलं असून ६ लोकांना सोडल्याची माहिती दिली आहे. त्यावर आता नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. पार्टीत १४ लोक होते तर आणखी ३ लोक कोण होते त्यांची नावे एनसीबीनं जाहीर करावीत असे आव्हान मालिकांनी दिल आहे.
“ते फूटेज जाहीर करा”
“मी म्हटलो ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते लोकं बाहेर पडतानाचं फुटेज जाहीर करा. तेव्हा तिथे चॅनलची लोकंही होतीच. भाजपाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडलं आहे. ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असं मी पुन्हा म्हणतो”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.