प्रतिनिधी /खानापूर
लॉकडाऊनमुळे खानापूर बस आगारातील सर्व बससेवा गेल्या दोन महिन्यापासून बंद होत्या. पण आता अनलॉक सुरू झाल्यानंतर बससेवा सुरू करण्यास राज्य परिवहन विभागाने परवानगी दिल्यानंतर सोमवारपासून खानापूर आगाराने 16 मार्गावर बससेवेला प्रारंभ केला आहे. त्यामध्ये प्रामुख्यांने खानापूर-बेळगाव मार्गावर 4 बस शिवाय खानापूर-दांडेली, खानापूर-इटगी मार्गावर बससेवेला प्रारंभ झाला. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करुन बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
टप्प्याटप्प्याने बससेवा वाढविणार
आता प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने बससेवा वाढवल्या जाणार आहेत. गेले दोन महिने बससेवा पूर्णतः बंद झाल्याने ग्रामीण जनतेची येण्या-जाण्याची गैरसोय झाली होती.
आता खानापूर-बेळगाव मार्गावर चार बससेवा सुरू झाल्या आहेत. या शिवाय दांडेली, हल्याळ आदी डेपेंच्याही बेळगावकडे जाणाऱया काही बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे समाधान पसरले आहे.