दरवषी शेकडो गवतगंजी होतायेत भस्मसात शेतकऱयांना फटका, चाराप्रश्न गंभीर, प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड येथील डोंगर पायथ्याशी ठेवलेल्या नऊ गवतगंजी आगीत भस्मसात झाल्या. त्यामुळे गवतगंजींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवषी शेकडो गवतगंजींना आग लागून नुकसान होते. मात्र प्रशासन याबाबत सुस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दरवषी शेकडो शेतकऱयांना फटका बसत आहे. शिवाय चाऱयाचा प्रश्न देखील गंभीर बनत आहे.
दरवषी उन्हाळय़ाला प्रारंभ झाला की, गवतगंजींना आग लागण्याच्या प्रमाणात वाढ होते. या घटनांमुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण होतो. पशुपालक सुगी हंगामादरम्यान भाताची मळणी करून गवताची साठवणूक करतात. शिवाय डोंगर भागात असलेल्या करड (गवताची) कापणी करून गवतगंजी घालतात. मात्र या गवतगंजींना आग लागून प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते. दरवषी उन्हाळय़ाच्या दिवसात हे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळते. याकरीता कृषी खाते, पशुसंगोपन खाते आणि अग्निशमनत दलाने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गांतून होत आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. दरम्यान अतिपावसामुळे चारा कुजला आहे. त्यातच नऊ गवतगंजी जळून खाक झाल्याने शेतकऱयांसमोर संकट निर्माण झाले आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावाच अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. अलीकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून जनावरे पाळणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. जनावरांना वर्षभर पुरेल इतक्मया सुक्मया चाऱयांची शेतकरी साठवणूक करतात. मात्र आगीच्या घटनांमुळे काही क्षणातच साठवणूक केलेला चारा भस्मसात होतो. त्यामुळे शेतकऱयांनी वर्षभर पीक काढण्यासाठी केलेला खर्च देखील वाया जातो.
पश्चिम भागातील डोंगर पायथ्याशी असलेल्या भागात अधिक प्रमाणात करडाचे (गवताचे) क्षेत्र आहे. जनावरे पाळणारे शेतकरी या करडाची कापणी करून साठवणूक करतात. मात्र काही अज्ञातांकडून आग लावली जात असल्याने चाऱयाचे नुकसान होत आहे. दरवषी आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासनाने यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
आग निवारण्याबाबत जनजागृती
आग लागू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेणे आणि ती लागली तर प्राथमिक अवस्थेतच ती विझविली जावी, अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरिता गावोगावी जनजागृती करणे आवश्यक आहे.
गवतगंजी जळल्याने बसला फटका…
सोमवारी लागलेल्या आगीत दोन गवतगंजी जळून खाक झाल्या आहेत. गवत कापण्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र आग लागून संपूर्ण गवतगंजी जळल्याने फटका बसला आहे. प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला असता. केवळ तुटपुंजी मदत दिली जाते. आगीच्या घटना कमी करण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
बुद्धाप्पा बाबू कणबरकर (नुकसानग्रस्त शेतकरी)