मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मांद्रेत प्रतिपादन : दिवसभर मुख्यमंत्र्यांचा मांद्रे मतदारसंघात दौरा
प्रतिनिधी /मोरजी
भाजप सरकार संवेदनशील सरकार असून अंत्योदय तत्वावर काम करताना भौतिक विकासाबरोबर प्रत्येक गोमंतकीयाचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राख्यण्याची खबरदारी घेऊन प्रत्येक क्षेत्रात गोव्याला स्वयंपूर्ण बनवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी मांद्रे येथे केले. त्यांनी काल मांद्रे मतदारसंघाचा दौरा केला.
पर्यटन विकास महामंडळतर्फे मांदेच्या श्रीभगवती सप्तेश्वर मंदिर परिसराचे अडीच कोटी खर्चून केलेल्या सुशोभिकारण कामाचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्यासोबत महामंडळाचे चेअरमन तथा मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, मांदेचे सरपंच सुभाष आसोलकर, पंच संतोष बर्डे, डेनिस ब्रिटो, विष्णू सावंत, महामंडळाचे संचालक सुदेश सावंत, सौ. सूचना अनंत गडेकर, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई, अभियंता बदामी, श्रीभगवती सप्तेश्वर देवस्थानचे अध्यक्ष हरी प्रभू, भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब, गोरख मांदेकर, पार्से सरपंच सौ. प्रगती सोपटे, माजी सरपंच बाबुसो हडफडकर यांच्यासह विविध पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासाकडे लक्ष केंद्रीत
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत आपण केवळ गोव्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले. कोरोनासारख्या महामरीच्या काळातसुद्धा आम्ही अनेक विकासकामे जशी मार्गी लावली तशाच विविध लोककल्याणकारी योजनाही मार्गी लावून समाजातल्या शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे देवी भगवतीप्रमाणे लोकांचे आशीर्वाद या सरकारवर निश्चितच आहेत.
भाजप सत्तेवर येणे काळाची गरज
स्वयंपूर्ण गोवा निर्माण करण्याच्या स्वप्न पूर्तीच्या दिशेने सरकार वाटचाल करीत आहे. उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी आणि खऱया अर्थाने गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी 2022 च्या निवडणुकीत भाजप सरकार विजयी होणे काळाची गरज आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितच विजयी होऊ. तुमचे आमदार दयानंद सोपटे आगामी सरकारात निश्चितच असतील. प्रत्येकाला नोकरी देणे शक्मय नसले तरी आम्ही 10 हजार नोकऱया येणाऱया काळात देऊ. त्यापैकी 5 हजार नोकऱया मार्गी लावल्या आहेत. पात्रतेनुसार या नोकऱया दिल्या जातील तसेच स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करू, असेही त्यांनी सांगितले
पर्यटन खात्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱया मंदिर सुशोभिकरणाच्या विद्युत रोषणाईचे बिल सरकारमार्फत भरण्याची तरतूद करू असे सांगितले.
आमदार दयानंद सोपटे म्हणाले की जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपल्याला कशाचीही चिंता नाही. लोकशाहीत जनतेच्या हाती जे अस्त्र आणि शस्त्र आहे त्याचा उपयोग करून लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. मंदिरातील देवदेवतांचे आशीर्वाद जसे आवश्यक आहेत तसे जनता जनार्दनाचेही आशीर्वाद महत्वाचे आहेत. हे आशीर्वाद गेल्या निवडणुकीत आपण दिलेत आणि 2022 च्या निवडणुकीतही आपल्या भरघोस पाठिंब्यावर मी निश्चितच आमदार होणार, असेही सोपटे म्हणाले.
सरपंच सुभाष आसोलकर, देवस्थानचे अध्यक्ष हरी प्रभू यांचीही भाषणे झाली. गोरख मांदेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. तारा हडफडकर यांनी आभार मानले.