होळी पौर्णिमेच्या रात्री केले जातेय सतीचे पूजन : दोन मुलांना साडी नेसवून होतेय विशेष पूजा
मनीषा सुभेदार /बेळगाव
स्त्राrवेष धारण केलेली दोन मुले… डोक्मयावर मुंडासे त्यावर गजरा…. गळय़ात माळा… हातात मोरपिसाचा तुरा आणि गावात सर्वत्र ही मुले घरोघरी जाताना त्यांची होणारी खास पूजा…. 500 वर्षांपासून चोर्ला गावात ही परंपरा जपली जात आहे. कोकण आणि शिमगा यांचे अनोखे नाते आहे. चोर्ला हे गाव महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या संस्कृतीचा प्रभाव या गावावर जाणवतो.
होळीच्या निमित्ताने या गावात एक अनोखी परंपरा वर्षानुवर्षे जपली जात आहे. गोवा-बेळगाव मार्गावर चोर्ला गावची कमान आपल्याला दिसते. होळीच्या दिवशी येथे होळी पेटविली जात नाही. परंतु फार वेगळय़ा अनेक वर्षांपासून जपलेल्या परंपरा येथे पाळल्या जातात. हे गावच नव्हे तर परिसरातही होळीच्या आधी रानातून मोठय़ा वृक्षाचे खोड आणून उभे केले जाते. त्याची विधिवत पूजा होते आणि त्याभोवती फेर घातला जातो.
मात्र चोर्ला गावात होळीच्या दिवशी रात्री सती पूजन केले जाते. सती प्रथेला तीव्र विरोध झाला आणि ती बंद झाली. तथापि, या गावातील सतीचे सत्व गावासाठी कल्याणकारी ठरले आहे, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे आणि म्हणूनच सती पूजन केले जाते. काय आहे हे सती पूजन? तर या दिवशी सात्तेकर आणि केळवेकर या दोन घराण्यांपैकी दोन मुलांना साडी नेसविली जाते. तत्पूर्वी ग्रामस्थांमध्ये हा मान कोणाला द्यावयाचा याबद्दल चर्चा होते आणि गावातील सती मंदिरानजीक मुलांना साडी नेसविली जाते. मात्र साडी नेसविण्यासाठी असणारी एक महिला वगळता तेथे अन्य महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
साडी नेसविल्यानंतर मुलांच्या हातात मोरपिसाचा तुरा देऊन त्यांना गावातील मानकरी घराण्यांमध्ये आधी नेले जाते. त्या दिवशी ही मुले देवळातच झोपतात आणि पुन्हा दुसरे दिवशी अंघोळ करून गावातील घराघरांमध्ये जातात. त्यांना फार पायपीट होऊ नये यासाठी ग्रामस्थ खांद्यावरून घेऊन जातात. या ठिकाणी त्यांची विशेष पूजा केली जाते. सती पूजनासाठी गावातील लग्न होऊन सासरी नांदणाऱया माहेरवाशीणी आवर्जून गावात येतात. या मुलांच्या समवेत गावातील अनेक मंडळी सोबत करतात आणि प्रत्येक ठिकाणी ते खास गाणीही म्हणतात.
ही प्रथा अथवा परंपरा काहीशी वेगळी आहे. या पूजेने हे गाव सती परंपरेचे समर्थन करते का? तर तसे नाही. किंबहुना सती पूजनामुळे या गावांमध्ये कोणतेही व्यसन केले जात नाही, ही फार महत्त्वाची बाजू आहे. सतीचे सत्व राखायला हवे, ही भावना ग्रामस्थांच्या मनात असल्याने येथे काही गैरप्रकारही होत नाहीत. आज कोणी सती जाता कामा नये, कायद्याने सुद्धा तो गुन्हा आहे, असे गावकरी म्हणतात.
मुलांना साडी का नेसविली जाते? याचे ठोस आणि नेमके उत्तर कोणाकडे नाही. परंतु 500 वर्षांपासून ही प्रथा जर चालत असेल तर त्याकाळी महिलांना किवा मुलींना बाहेर जाण्यास सुरक्षित वातावरण नव्हते. त्यात हा जंगल परिसर हे एक कारण असावे, असे आपण म्हणू शकतो.
500 वर्षांपूर्वी गेली होती एक महिला सती!
याबाबत 80 वर्षांच्या कृष्णा या आजोबांशी संवाद साधला. त्यांच्या मते 500 वर्षांपूर्वी या गावात एक जोडपे होते. त्यातील पतीला दुर्धर आजार झाला. त्याने जगावे यासाठी पत्नीने अपार कष्ट घेतले. परंतु पती दगावला. दुःखी झालेल्या पत्नीने जांभळाच्या झाडाला झोपाळा बांधून तेथे गाणी म्हटली आणि कोणालाही न जुमानता ती सती गेली. ती ज्या ठिकाणी सती गेली त्या ठिकाणी गावकऱयांनी मंदिर बांधले. हे मंदिर एका रात्रीत पूर्ण व्हावे, असा दृष्टांत मिळाल्याने ते आव्हान गावकऱयांनी पेलले.
सती पूजनाने मागणी पूर्ण होते
दरवषी या पूजेसाठी माहेरी येते. विवाहानंतर बरीच वर्षे मला मूल नव्हते. मी सती पूजन करताना मातृत्व प्राप्त व्हावे, असे मागणे केले आणि ते पूर्ण झाले. सती पूजन करताना जी इच्छा आपण व्यक्त करतो ती पूर्ण होते, अशी गावकऱयांची श्रद्धा आहे. त्याचा प्रत्ययही गावकऱयांना आला आहे. त्यामुळे प्रत्येक माहेरवाशीण या दिवशी गावात येते.