आतापर्यंत 99 लाख 32 हजार लोक संक्रमित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात आतापर्यंत 99 लाख 32 हजार 548 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 26 हजार 382 नवीन बाधित रुग्ण सापडले आहेत. मात्र, 33 हजार 813 रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासात 387 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामधून आतापर्यंत 94 लाख 56 हजार 449 रुग्ण बरे झाले आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 44 हजार 96 लोकांना आपला जीव गमवावा लागला. चालू महिन्यात 1 ते 14 डिसेंबरपर्यंत कोरोनामधील सक्रिय रुग्णांमध्ये 96 हजार 444 घट झाली आहे. त्यामुळे आता देशातील सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा 3 लाख 32 हजार 2 इतका आहे.
भारतात कोरोना संसर्गामुळे 11 राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक 85 टक्के इतके आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. मागील पंधरवडय़ात गंभीर स्थिती निर्माण झालेल्या दिल्लीत आता परिस्थिती सुधारत आहे. मंगळवारी दिल्लीत सकारात्मकतेचे प्रमाण 1.9 टक्के नोंदविण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वात कमी आहे. मंगळवारी दिल्लीमध्ये 1,617 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 2,343 लोक बरे झाले आणि 41 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश यासह काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे सक्रिय प्रमाण, मृत्यू आणि रिकव्हरी प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूची संख्या आणि सक्रिय प्रकरणांच्या दरात सातत्याने घटत आहे.
ही दिलासादायी बाब आहे. गेल्या 17 दिवसांपासून कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमधून आणखी काही बरे झाले आहेत. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.45 टक्के आहे, तर रिकव्हरीचा दर 95 टक्के आहे. सक्रिय रुग्ण 4 टक्क्मयांपेक्षा कमी झाले आहेत.