प्रत्येक सजीवाला त्याच्या संरक्षणासाठी कोणते ना कोणते शस्त्र निसर्गतःच मिळालेले आहे. बकऱयांना त्यांच्या संरक्षणासाठी कठीण अशा शिंगांचा लाभ झाला आहे. जेव्हा बकरे एकमेकांत लढतात, तेव्हा एकमेकांवर शिंगांचा वार करतात. या लढाईत अनेकदा त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. काहीवेळा जखम खोल असेल तर त्यांचा मृत्यूही होतो. ही लढाई कोणी थांबवू शकत नाही.
उत्तर प्रदेशातील एका शेतकऱयाने यावर नामी शक्कल शोधून काढली आहे. त्याने त्याच्या बकऱयांच्या शिंगांना प्लॅस्टीकचे मऊ आवरण घातले आहे. त्यामुळे बकरे एकमेकांमध्ये कितीही भांडले आणि झगडले आणि त्यांनी शिंगांनी एकमेकांना मारले तरी कोणीही जखमी होत नाही. सध्या हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून तो लाखो लोकांनी पाहिला आहे. शेतकऱयाच्या या युक्तीमुळे बकऱयांची भांडण्याची हौसही भागते आणि ते जखमीही होत नाहीत. त्यामुळे शेतकऱयाला त्यांची मारामारी सोडविण्यासाठी मधे पडावे लागत नाही. एकंदर, हा उपाय शेतकरी आणि त्याचे बकरे व बकऱया यांच्यासाठी उपयोगी ठरला आहे.