इमारतीच्या कामाचा दर्जा चव्हाटय़ावर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रविवारपासून जिल्हय़ाला तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. वादळाच्या प्रभावाने पावसाने जिल्हाभर थैमान घातले. या पावसाने जिल्हा रूग्णालय इमारतीच्या कामातील बोगसगिरी बाहेर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती. धो-धो कोसळणाऱया पावसाचे पाणी साचून जिल्हा शासकीय रूग्णालयाची अवस्था तळय़ासारखी झाली. याचा सर्वाधिक फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे.
मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचल्यांने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पूर्ण रात्र जागून काढावी लागली. जिल्हा रूग्णालयाची इमारत तलाव बनल्याने रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक चिंतातूर झाले होते. मोठय़ा प्रमाणावर पावसाचे पाणी जिन्यासह पॅसेजमध्ये जमा झाले. या पॅसेजमध्ये रूग्णांचे नातेवाईक रात्री थांबलेले असतात. यामुळे त्यांचीही तारांबळ उडाली आणि त्रास सहन करावा लागला.
गळती नाही, झडीमुळे पाणी साचले- डॉ. संघमित्रा फुले
जिल्हा शासकीय रूग्णालयात कोठेही कोणत्याही प्रकारे गळती झालेली नाही. जेरदार वारा आणि पाऊस यामुळे झड बसून इमारतीच्या पॅसेजमध्ये पाणी साचले. मात्र गळती कुठेही नव्हती. साचलेले पाणी सकाळी कर्मचाऱयांनी साफ केले, असे स्पष्टीकरण जिल्हा् शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिले.