वृत्तसंस्था/ मुंबई :
कोविड 19 मुळे सध्या जगभरासोबत देशातील कंपन्या वेगवेगळय़ा अडचणीचा सामना करीत आहेत. यामध्ये काही कंपन्या आपल्या उत्पादनातील घट कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आता जीवन विमा कंपन्याही अतिरीक्त खर्च रोखण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार आहेत. जीवन विमा कंपन्या आपल्या शाखांची संख्या व कर्मचाऱयांची संख्या कमी करण्याचा विचार करणार आहेत.
विमा उद्योगामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022 च्या मध्यापर्यंत 11,600 शाखांमधील जवळपास 6 ते 8 टक्के शाखांमधील खर्च कमी करण्यासाठी त्या बंद करण्याचा निर्णय हेण्याची शक्मयता आहे. इंटरनेट जोडणीसह मोठय़ा शहरांमधील शाखा बंद होण्याचा अंदाज आहे. तसेच डिजिटल प्लॅटफार्मच्या आधारे देशभरामध्ये विशेष सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मोठय़ा शहरांमध्ये विविध विमा कंपन्यांच्या शाखा भरपूर आहेत. यामध्ये होणारा विनाकारण जादा खर्च थोपवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येणार असून नवीन मार्गाने व्यवसाय जुळवण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
पॉलिसी विकण्याचा प्रयत्न
सध्या बँक आणि एजन्ट जीवन विमा कंपन्यांसाठी हे दोन सर्वात मोठे वितरणाचे महत्त्वाचे दुवे आहेत. कोविड 19 चा प्रसार कमी करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी लॉकडाऊन चौथ्या सत्रात सुरु आहे. या काळात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक त्या आधुनिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला जातोय. कंपन्या व बँका वेबसाईटच्या आधारे ग्राहकांना व्हिडीओ कॉल करुन पॉलिसी विकत आपला व्यवसाय कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.