बहाई ऍकॅडमीच्या हॉलमध्ये शुक्रवारी दिवसभर सभा
प्रतिनिधी/ सातारा
गेली सोळा महिने कोरोनामुळे कामाच्या तणावाखाली जिल्हा परिषदेतील सर्वच खातेप्रमुख दिसत होते. जराशी हवापालट म्हणून पाचगणी शहरात शनिवारी जिल्हा परिषदेची समन्वय सभा पार पडली. सकाळीच सर्व खातेप्रमुखांचा आढावा बहाई ऍकॅडमीच्या हॉलमध्ये घेण्यात आला. मात्र, त्यानंतर सलग दोन सुट्टया असल्याने फुल टु एंजॉय अधिकाऱयांनी केल्याची कुजबुज जिल्हा परिषदेत सुरु होती. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या दि. 1 रोजी होणाऱया सभेत उमटणार आहेत.
सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकाऱयांची अचानकपणे समन्वय सभा चक्क पाचगणीत बहाई ऍकॅडमीत आयोजित करण्यात आली. या सभेला कोणीही पदाधिकारी नव्हते. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची हजेरी होती. सकाळी 9 वाजता सभेला सुरुवात झाली. ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सकाळी 10.30 ते 2 वाजेपर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जलजवीन मेशन, पाणी टंचाई, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम, स्वच्छता मिशनच्या आढाव्यात घनकचरा प्रकल्प, नॉब आराखडा, ओडीएफ सर्व्हेक्षण, त्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण जीवन्नोती अभियान, ग्रामपंचायत विभाग, रोजगार हमी योजना, बांधकाम यांचा आढावा घेण्यात आला. दुपारी 2.30 ते विषय संपेपर्यंत आरोग्य, प्राथमिक शिक्षण, महिला बालकल्याण, आयसीडीएस, लघु पाटंबंधारे, पशुसंवर्धन, कृषी, अर्थ विभाग, समाजकल्याण, सामान्य प्रशासन या विभागाचा आढावा सायंकाळी उशीरापर्यंत सुरु होता. त्यामुळे समन्वय सभेची उलटसुलट चर्चा सुरु असून दि. 1 रोजी होणाऱया जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये याचे पडसाद उमटणार असून पदाधिकाऱयांकडून झाडाझडती होणार असल्याची चर्चा सुरु आहे.