नवी दिल्ली
पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलने झारखंडमधील कारखान्यांमध्ये 3000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 3 वर्षात ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गुंतवणूकीनंतर कारखान्यातील उत्पादनात वाढ केली जाणार आहे. या नव्या गुंतवणुकीसह 5 लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळवून देण्यासाठी नजिकच्या काळात प्रयत्न होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.