योग्य ती कारवाई करण्याची कोगनोळीवासियांची मागणी : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोगनोळी टोलनाक्मयावरील टोल चुकविण्यासाठी वाहनचालक कोगनोळी गावातून वाहने वाहतूक करत आहेत. यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे मोठा धोका असून अपघात घडण्यापूर्वी ही वाहतूक थांबवावी, अशी मागणी कोगनोळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागूनच कोगनोळी गाव आहे. सध्या या गावातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेला कोगनोळीचा टोल चुकविण्यासाठी वाहनचालक गावातून वाहने नेत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. यापूर्वी अशा वाहनांमुळे तिघांचा बळी गेला आहे. तरी त्याबाबत गांभीर्याने विचार करून ही वाहतूक अडविणे तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोगनोळीमधील शाळा रस्त्यावरच आहेत. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरून ये-जा करत असतात. तेव्हा अपघात घडण्यापूर्वी तातडीने ही वाहतूक थांबणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाहतुकीमुळे रस्ता खराब होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीही होत आहे. तेव्हा अधिकाऱयांची बैठक घेऊन ही वाहतूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य बाबासा कागले, अनिल चौगुले, मारुती कोळेकर, तात्यासा कागले, ज्ञानेश्वर डांगरे, कृष्णात भोजे, संजय पाटील, राजेंद्र शिंत्रे, युवराज कोळी, कृष्णात खोत, विठ्ठल कोळेकर, अनिल नवाळे, राहुल मेत्री, बाबासाहेब हळिज्वाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.