प्रतिनिधी/ सातारा
पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून विविध विकासकामांचे शुभारंभ करण्यात आले. शेती पाटबंधारे, अंतर्गत खडीकरण कॉक्रीटकरण, रस्ते, पाणी योजना, साकवपूल, आशा कामांसाठी तब्बल 17 कोटीचा निधी या विभागात विविध वाडय़ा-वस्त्या गावे, येथील सोयीसुविधासाठी खर्च करण्यात आला आणि काही कामं पूर्णत्वास गेली आहेत.
तसेच तारळे ग्रामपंचायत सदस्य हे स्वगृही देसाई गटात परतले त्याबद्दल कार्यक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच सुधा पवेकर व सदस्य प्रणिल यादव व किरण सोनवले शिवदौलत सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निवड झालेले संजय देशमुख व शिव दौलत संचालकपदी माणिक पवार यांची निवड झाली. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तारळे नगरीत शंभूराज देसाई साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
चित्ररथात बसवून बँन्ड बाजा वाजवता भव्य मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला आर्चरी ब्रिज आंबळे तारळे नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या ब्रिजचे 200 वर्ष आयुष्य आहे. तसेच तारळे ते मरळोशी या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. पुढील काही दिवसात तो रस्ता रुंदीकरण करून पक्का रस्ता केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी विविध वाडय़ातील कार्यकर्त्यांनी शिवसेनामध्ये देसाई गटात चिंचेवाडी, जळव, तारळे येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
मंत्री देसाई कार्यक्रमावेळी म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सोसायटी निवडणुकांमध्ये देसाई गटाचे उमेदवार निवडून द्यावेत असे जनतेला आवाहन केले. विकासकामे खेचून आणण्यात कोठेही कमी पडणार नाही. जनतेच्या सोयी-सुविधासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. विरोधकांच्या भूलथापांना अमिषांना बळी पडू नका. खरा विकास कोण करतोय हे ओळखायला शिका त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा. पाटण तालुका विकासाचे रोल मॉडेल बनवणार असे प्रतिपादन केले. कार्यकर्ते व पदाधिकाऱयांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कामाला लागण्यास तयारी करा. विविध निवेदने भागातील कामाची देण्यात आली. आंबळे पुलाचे काम बांधकाममंत्री असताना लोकप्रतिनिधी करता आले नाही पण नियतीने मला पुन्हा आमदार करून माझ्याकडून काम करून घेतल्याचे भाग्य मला लाभले. तारळे विभाग कोअर कमिटीचे काम चांगले आहे. तसेच तारळे ग्रामपंचायतीमध्ये आता संख्याबळ वाढले असून विकासकामे होणार आहेत. मी सदैव तारळे विभागाच्या पाठीशी उभा आहे.
या कार्यक्रमप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अभिजीत पाटील, गजानन जाधव, बबनराव शिंदे, श्रीकांत जाधव, सोमनाथ खामकर, नामदेवराव साळुंखे, रणजित शिंदे, एम. डी. जाधव, श्रीकांत सोनवले, युवराज नलवडे, विकासराव जाधव, रवींद्र सपकाळ व विभागातील आजी माजी सरपंच उपसरपंच कार्यकर्ते उपस्थित होते.