खानापूर, बैलहोंगल येथे जिल्हाधिकाऱयांनी घेतली तातडीने बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे. वेळीच कोरोनावर आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे तातडीने प्रत्येक तालुक्मयात कोरोना वॉररुमची स्थापना केल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
खानापूर येथे त्यांनी तालुक्मयातील अधिकाऱयांची बैठक घेतली. तसेच कोविडबाबतचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करावी व कोविडचे नियम न पाळणाऱयांवर दंडात्मक कारवाई करावी, असा आदेश दिला. सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अधिकाऱयांनी कार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मंगळवारी खानापूर, बैलहोंगल, कित्तूर तालुक्मयांमध्ये जिल्हाधिकाऱयांनी बैठका घेतल्या. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवा. कोणत्याही प्रकारची हयगय करू नका, प्रत्येक तालुक्मयामध्ये अधिकाऱयांचा एक कक्ष स्थापन करा. ते सतत कार्यरत रहावेत, यासाठी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत.
प्रत्येक तालुक्मयात दररोज 500 हून अधिक व्यक्तींची तपासणी होणे महत्त्वाचे आहे. संक्रमित व्यक्तींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विविध अधिकारी उपस्थित होते.