वार्ताहर/ किणये
तालुक्मयात रविवारी दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. खरीप हंगामासाठी पाऊस पडावा, अशी आस धरून राहिलेल्या शेतकऱयांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील कामांना जोर आला आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून तालुक्मयात पावसाने उघडीप दिली होती. यामुळे आता खरीप हंगामातील कामे कशी करायची, याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली होती. मात्र, पुनर्वसू नक्षत्राने तालुक्मयात बऱयापैकी एन्ट्री केल्यामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना जोर आला आहे.
रविवारी तालुक्मयात लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनला प्रतिसादही बऱयापैकी लाभला. अनेकांनी रविवारी घरातच राहणे पसंत केले. मात्र, बळीराजा शिवारात काम करताना दिसत होता. पावसाच्या उघडिपीमुळे शिवारात रोप लागवड करण्यासाठी चिखलाची कामे ठप्प झाली होती. त्या कामांना चालना मिळाली आहे. चिखल मशागत झाल्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत रोप लागवडीच्या कामांना जोर येणार आहे.