रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होतेय वाढ : इतर मार्गावरही नव्या एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवासासाठी वेटींगवर रहावे लागत आहे. विशेषतः विकेंडला दिल्ली, मुंबई, तिरुपती या शहरांत चार ते पाच दिवसांचे वेटींग लागत आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी 8 दिवस आधी प्रवासी बुकिंग करीत आहेत. प्रवासीसंख्या वाढल्याने इतर मार्गावरही नव्या एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनामुळे मध्यंतरी दोन वर्षे मोजक्मयाच रेल्वे धावत होत्या. त्यातच महाराष्ट्र, केरळ, गुजरात यासारख्या राज्यांमधून येणाऱयांना आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आली होती. यामुळे प्रवास करणाऱयांची संख्या कमी होत होती. जानेवारी 2022 पासून आरटीपीसीआरची सक्ती रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळूर येथील महानगरांना ये-जा करणाऱयांची संख्या वाढली आहे.
बेळगावमधून दिल्लीला जाण्यासाठी वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस उपलब्ध आहे. बेळगावमधून पुणे, मध्यप्रदेश, दिल्ली या मार्गावर प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असल्यामुळे वेटींग लागत आहे. मुंबई शहरासाठी दररोज 2 एक्स्पेस धावत असल्या तरी त्यांनाही वेटींग लागत आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो प्रवासी बेळगावमधून जातात. त्यामुळे कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला देखील वेटींग लागत आहे. बेळगावमधून बेंगळूरला जाण्यासाठी दररोज तीन रेल्वे धावत असल्यामुळे त्या मार्गावर तितकेसे वेटींग लागत नाही.
बेळगाव रेल्वेस्थानकातून दररोज 1500 ते 2000 प्रवासी इतर शहरांना जातात. तर तितकेच प्रवासी रेल्वेने शहरात येतात. केवळ बेळगावच नव्हे तर खानापूर, चंदगड, बैलहोंगल, निपाणी या परिसरातील नागरिक बेळगावमधून रेल्वेचा प्रवास करतात. बऱयाच एक्स्प्रेस या रात्रीच्या असल्यामुळे प्रवास सोयीस्कर ठरत आहे. अल्पदरात सुरक्षित प्रवास रेल्वेने होत असल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती रेल्वेला मिळत आहे.
धावत असलेल्या एक्सप्रेस
- म्हैसूर – बेळगाव
- हुबळी – दादर
- बेंगळूर – बेळगाव
- बेंगळूर – मिरज
- तिरुपती – कोल्हापूर
- वास्को – निजामुद्दीन (दिल्ली)
- बेळगाव – शेडबाळ
धावत असलेल्या साप्ताहिक एक्सप्रेस
- यशवंतपूर – ह. निजामुद्दीन
- बेंगळूर – जोधपूर
- म्हैसूर – अजमेर
- बेंगळूर – अजमेर
- बेंगळूर – गांधीधाम
- एर्नाकुलम – पुणे
- पुद्दुचेरी, तिरुवेनवेल्ली, म्हैसूर – दादर
- तिरुचिरापल्ली- गंगानगर